शुक्रवार, १९ जून, २०१५

त्या काकांचे उपकार

त्या काकांचे उपकार

मागल्या आठवड्यात भाचाआणि पुतण्याच्या दहावीचा निकाल लागला आणि मग ताई-वाहिनीशी बऱ्याच वेळ गप्पा झाल्यात  कुठला course करायला पाहिजे कशाला जास्त scope  आहे . आणि आमच्यावेळी जो प्रश्न विचारल्या जायचा नाही तो पण चर्चिल्या गेल्या. मुलांना काय आवडते ?? हा प्रश्न आमच्या वेळी नव्हताच  syllabus मधे. मार्क्सच्या नुसार कोणी काय करायचं ते ठरलेलं असायचं.

माझ मन भूतकाळात रमत माझ्या दहावीच्या रिझल्ट भोवती रेंगाळत होत. माझा result हा माझ्यासाठी ठीक ठाक होता. ना ख़ुशी ना गम . पण पुढे काय करायचं याचा  खरच विचार नव्हता केला.
" तू आयुष्यात पुढे काय करणार ??" हा प्रश्न कितीवेळा विचारल्या गेला असेल देव जाणे. interview मधला तर ठरलेला प्रश्न आणि त्यावर तुम्ही किती आत्मविश्वासाने नितांत खोट उत्तर देवू शकतात यावर तुमच select होण ठरलेलं असत. अरे आयुष्य किती मोठ ?? आणि खरच मोठ का ते पण माहित नाही. पण काय करणार ? ह्याचा विचार करत आयुष्याची मजा घालवायला नको.
मला हा प्रश्न अगदी आयुष्याच्या level  ला पडला नव्हता. पण दहावी  नंतर काय ?? हा प्रश्न होता. पुढला प्रश्न तिथे पोहोचल्यावर ठरवलं असत. दिशा ठरवली कि बर असत . प्रवासच ठिकाण अगदी  आत्ता पासून ठरवायला हा काही दिवसांचा प्रवास नाही ना !!!! असो  विषय phillosophy  चा नाहीच मुळी.

माझ्या result नंतर मला सल्ले देण्याऱ्या हितचिंतकांची रांग लागली होती. जे जवळचे कळकळीने सांगणारे होते त्यांनी मला काय जमेल, झेपेल आणि परवडेल याचा विचार करून सगळ्या options ची यादी तयार केली. आणि त्यातला निवडायला मदत पण केली. चांगली आर्थिक परिस्थिती खूप सारे प्रश्न आपोआप सोडवते पण तीच परिस्थिती चांगली नसेल तर आपल्या जवळ प्रश्न सोडवणारी किती आपली  लोकं असतात हे कळत. मला याचा प्रत्यय आला. जो तो आपल्या परीने मदत करत होता.
माझ्या समोर बरेच options होते पण सोप्पा म्हणून ११-१२ चा form भरून मोकळा झालो होतो. मोकळा कसला खूप साऱ्या विकल्पाचा वेढा पडला होता. डिप्लोमा करण्याचा पर्याय समोर होता जो बऱ्याच लोकांनी सुचवला होता. काही दिवसात science ची यादी आली आणि त्यात अगदी शेवटून दुसरा number  आला. माझ्या नंतरचा विद्यार्थी दुसऱ्या शहरात जाणार होता म्हणजे तसा मीच शेवटचा होतो.

एके दिवशी घरातले सगळे विषय चहासोबत चघळत होतो. चर्चा करता करता कधी ११ वाजले कळले नाही. बाबांचे एक मित्र घरी आलेत त्यांच्या मुला सोबत. तो मुलगा - आवेश माझ्या batch चाच होता दुसऱ्या शाळेतला. माझ्या पेक्षा एक टक्का कमी होता त्याचा पण काकांनी त्याच्या भविष्याचा विचार आधीच केला होता. commerce ला जायचं ठरलं होतं त्याचं, म्हणजे काकांनीच ठरवलं होत. त्यांच्या बोलण्यावरून आवेशचा या decision मध्ये मोठ्ठा सहभाग होता आणि तो म्हणजे ते follow करायचं. असो.

काकांनी आपले विचार प्रकट केलेत. माझ्या वरच्या जवाबदारीचे  विश्लेषण केले आणि माझ्या समोरच्या सर्व पर्यायांचे  पृथःकरण. मी डिप्लोमा केल्याने मला होण्याऱ्या फायद्यांची इतकी मोठी यादी माझ्या समोर कोणीच  ठेवली नव्हती. आणि आवेशसाठी पण हाच पर्याय निवडला असता असे म्हणून तर काकांनी आम्हाला निर्णयाजवळ जाण्यास मदत केली. मी काकांचे आभार मानले आणि विचार केला कि किती कळकळीने आलेत ते आणि समजवले पण !! मी त्यांना आयुष्यभरासाठी लक्षात ठेवीन असा मनाशी निर्धार केला.

काही महिन्यांनी अकोल्याला आलो.  डिप्लोमाला 
admission झाल्यानंतरची माझी पहिली चक्कर. मित्रांची जत्रा जमली. माझ्या नव्या शहराच्या गमती, त्यांच्या नव्या tuitions च्या वेळा आणि जागा यावर मनसोक्त गप्पा झाल्यात. कुणीतरी आवेश चा विषय काढला. त्याला science मध्ये जागा मिळाली. मी जरा आश्चर्य चकित झालो, " अरे तो तर commerce  घेणार होता ना ??" 

" नाही रे. तू डिप्लोमा ला गेलास. आणि List मधे तुझ्या नंतरचा candidate अकोला सोडून जाणार होता. Waiting list मधे आवेशचा number पहिला होता त्यामुळे तुम्ही  दोघांनी admission न घेतल्यामुळे त्याला admission मिळाली ना तिकडे !!"

बाप रे !! मला काकांच्या उपकारांच ओझ जास्त वेळ वाहाव लागल नाही. पण त्याच्या अश्या वागण्याचा राग नाही आला, भीती वाटली.  आपण या पुढे कोणाच्या सल्ल्यामध्ये  स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. आश्चर्य आवेशच पण वाटल त्याला असली मानसिकता पटली पण आणि निमूटपणे तो त्याचाच भाग झाला !!!!

आयुष्यात पुढे काय करणार यापेक्षा काय करायचे नाही याचे हे असे नि:शुल्क शिकवणी वर्ग असतात, फक्त डोळे उघडे ठेवून शिकायचं !!! Thanks Kaka !!!!

(सत्य घटनेवर आधारित )

अमित जहागीरदार
१९ जून २०१५

मंगळवार, २ जून, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 2- रांगेचा फायदा सर्वांना !!

रांगेचा फायदा सर्वांना !!


रांगेत उभे राहून निर्माण झालेली एखादी प्रेम कथा असावी असा साधा simple कयास बांधू नका.
नाजूक मनावर आघात पण होऊ शकतो कारण हि रांग आणि तिचा केलेला उपयोग खूप unique  आहे.....

खूप दिवसांनी सुहासला रेवती सोबत J M  रोडवर फिरतांना बघितलं. आणि college चे दिवस आठवले. college   मध्ये सुहास topper  असायचा आणि रेवती त्याला आवडायची हे सगळ्या college माहित होतं. पण त्याने तिला propose केलं नव्हत. college मधली  ती love story आता फुलून आलेली दिसतेय असा विचार करून मी संध्याकाळी सुहासला गाठल आणि सुरुवात केली.
" अरे रेवती सोबत बघितलं तुला आज"
" अ ...अरे तसं  काही नाही बाबा.. बर चल बाहेर जरा निवांत बसून जुन्या college गोष्टीत बुडून जावू."

मी आणि सुहास बाहेर आलो शहराच्या गर्दीतून थोडं दूर ..एक चांगली जागा शोधून तिथे बिअरच्या सोबतीला बसलो.
सुहास सांगू लागला ..college च्या गप्पा झाल्यात आणि मग विषयाने सगळ्यात romantic  वळण घेतलं. सुहासच्या बोलण्यात रेवती यायला लागली आणि माझी उत्कंठा शिगेला पोहोचली.
थोडासा गालातल्या गालात हसत त्याने तिचा उल्लेख करायला सुरुवात केली.

" मला रेवती आवडायची हे सगळ्या college ला जस  माहित होत तसं तिला पण चांगल माहित होत. पण नेहमी first आल्यावर ती wish करायला यायची. मला काही दिवसांनी वाटायला लागले कि तिच्या एका wish  साठी top  कराव  आणि परीक्षा सहा महिन्यांनी नाही तर दर महिन्यात यावी. ( मला थोडी भीती वाटायला लागली त्याच्या अश्या अपेक्षांची )
पण कधी तिच्याशी बोलण्याची हिम्मत  कधी झाली नाही. शेवटच्या वर्षाला जेह्वा सगळे जण जास्त अभ्यास करण्याचे plans  बनवत होते तेह्वा मी रेवतीशी कधी आणि काय बोलायचे याचा प्लान करत होतो.  अभ्यासातल्या कुठल्याही problem कधी इतका घाबरलो नव्हतो. वेगवेगळ्या  क्लुप्ता मनात  येत होत्या पण कोणतीच प्रत्यक्षात येईल असे वाटत नव्हते . february तला valentine  day पण मदतीला धावून आला नाही। पण तिच्या मार्चमधल्या वाढदिवसाला काही तरी करण्याचे प्लान झालेत.

प्लान तयार झाला - तिच्या साठी एक छान ग्रीटिंग कार्ड घेतलं  आणि काय काय बोलायचं याचा सराव केला. college मध्ये आल्या आल्या तिला wish  केल आणि नंतर बोलू या अस तिला सांगून मी क्लास  मधे गेलो. पहिल्यांदा अस घडल कि  शिकवण्याकडे लक्ष नव्हत. खिडकीमधून सारखं बाहेर बघावस वाटत होत .  गुलमोहोराच्या झाखालच्या  एका बाकाकडे लक्ष गेलं . मनात आल आता काही दिवसांनी हा बाक एकटा नसेल, त्या बाकावर कितीतरी प्रेमाच्या गोष्टी माझ्या आणि रेवती सोबत गर्दी करतील . असे बरेचसे विचार  मनात गोंगावत असतांना अचानक रेवती तिथे दिसली.  ते माझं स्वप्न आहे कि काय याची शहनिशा करण्याची थोडी गरज वाटली असंतांना हा विचार नाहीसा  झाला . रेवती सोबत तिच्या क्लास मधला रोहित दिसला. तिचा birthday असल्यामुळे wish  करत असेल असा विचार करून मी क्लास मध्ये काय चालू आहे याकडे  लक्ष देण्याचा प्रयत्न केला.

lecture संपल  आणि तसाच  गुलमोहोराकडे पळालो . रोहितने पण अगदी छान timing साधाल होत मी तिकडे निघालो आणि तो पण क्लास कडे वळला. मी पूर्ण शक्ती एकवटून तिला सांगितलं कि मला तुझ्याशी काही तरी बोलायचं आहे. मनातले भाव बोलून दाखवले आणि तिच्या उत्तरासाठी थांबलो. ती हसली गालातल्या गालात आणि मला वाटले कि आता ते ऐकायला मिळेल ज्याची मी वाट बघत होतो.

ती म्हणाली, " तू थोडा उशीरा आलास."
".?."

मला  काहीच कळले नाही.
" आत्ता रोहित ने मला प्रपोज केले.  तो तुझ्या आधी माझ्याकडे हे बोलून गेला आणि  मी त्याला 'हो' म्हणले. "
".."
मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारला आणि तिथून पळ काढला."

त्याच बोलणं संपल पण माझ हसण थांबत नव्हत.
पण आता ती परत कशी आणि कुठे भेटली  हे मला ऐकण्याची खूप उत्सुकता होती. त्याला ते कळले असावे.
" 7 दिवसांनी पूवी ती पुण्यात आली आणि मला contact  केला. भेटल्यावर म्हणाली कि रांग पुढे सरकायला काही हरकत नाही."
" तसाही दुसरा number तुझा होता."

मी त्याला टाळी देत म्हटलं "चला म्हणजे रेवतीने तुला परीक्षेत मिळणारा पहिला number इथे पळवला म्हणायचं .

म्हणतात ना  रांगेचा फायदा सर्वांना !!!!!



अमित जहागीरदार
२०१२
पुणे