शुक्रवार, १९ जून, २०१५

त्या काकांचे उपकार

त्या काकांचे उपकार

मागल्या आठवड्यात भाचाआणि पुतण्याच्या दहावीचा निकाल लागला आणि मग ताई-वाहिनीशी बऱ्याच वेळ गप्पा झाल्यात  कुठला course करायला पाहिजे कशाला जास्त scope  आहे . आणि आमच्यावेळी जो प्रश्न विचारल्या जायचा नाही तो पण चर्चिल्या गेल्या. मुलांना काय आवडते ?? हा प्रश्न आमच्या वेळी नव्हताच  syllabus मधे. मार्क्सच्या नुसार कोणी काय करायचं ते ठरलेलं असायचं.

माझ मन भूतकाळात रमत माझ्या दहावीच्या रिझल्ट भोवती रेंगाळत होत. माझा result हा माझ्यासाठी ठीक ठाक होता. ना ख़ुशी ना गम . पण पुढे काय करायचं याचा  खरच विचार नव्हता केला.
" तू आयुष्यात पुढे काय करणार ??" हा प्रश्न कितीवेळा विचारल्या गेला असेल देव जाणे. interview मधला तर ठरलेला प्रश्न आणि त्यावर तुम्ही किती आत्मविश्वासाने नितांत खोट उत्तर देवू शकतात यावर तुमच select होण ठरलेलं असत. अरे आयुष्य किती मोठ ?? आणि खरच मोठ का ते पण माहित नाही. पण काय करणार ? ह्याचा विचार करत आयुष्याची मजा घालवायला नको.
मला हा प्रश्न अगदी आयुष्याच्या level  ला पडला नव्हता. पण दहावी  नंतर काय ?? हा प्रश्न होता. पुढला प्रश्न तिथे पोहोचल्यावर ठरवलं असत. दिशा ठरवली कि बर असत . प्रवासच ठिकाण अगदी  आत्ता पासून ठरवायला हा काही दिवसांचा प्रवास नाही ना !!!! असो  विषय phillosophy  चा नाहीच मुळी.

माझ्या result नंतर मला सल्ले देण्याऱ्या हितचिंतकांची रांग लागली होती. जे जवळचे कळकळीने सांगणारे होते त्यांनी मला काय जमेल, झेपेल आणि परवडेल याचा विचार करून सगळ्या options ची यादी तयार केली. आणि त्यातला निवडायला मदत पण केली. चांगली आर्थिक परिस्थिती खूप सारे प्रश्न आपोआप सोडवते पण तीच परिस्थिती चांगली नसेल तर आपल्या जवळ प्रश्न सोडवणारी किती आपली  लोकं असतात हे कळत. मला याचा प्रत्यय आला. जो तो आपल्या परीने मदत करत होता.
माझ्या समोर बरेच options होते पण सोप्पा म्हणून ११-१२ चा form भरून मोकळा झालो होतो. मोकळा कसला खूप साऱ्या विकल्पाचा वेढा पडला होता. डिप्लोमा करण्याचा पर्याय समोर होता जो बऱ्याच लोकांनी सुचवला होता. काही दिवसात science ची यादी आली आणि त्यात अगदी शेवटून दुसरा number  आला. माझ्या नंतरचा विद्यार्थी दुसऱ्या शहरात जाणार होता म्हणजे तसा मीच शेवटचा होतो.

एके दिवशी घरातले सगळे विषय चहासोबत चघळत होतो. चर्चा करता करता कधी ११ वाजले कळले नाही. बाबांचे एक मित्र घरी आलेत त्यांच्या मुला सोबत. तो मुलगा - आवेश माझ्या batch चाच होता दुसऱ्या शाळेतला. माझ्या पेक्षा एक टक्का कमी होता त्याचा पण काकांनी त्याच्या भविष्याचा विचार आधीच केला होता. commerce ला जायचं ठरलं होतं त्याचं, म्हणजे काकांनीच ठरवलं होत. त्यांच्या बोलण्यावरून आवेशचा या decision मध्ये मोठ्ठा सहभाग होता आणि तो म्हणजे ते follow करायचं. असो.

काकांनी आपले विचार प्रकट केलेत. माझ्या वरच्या जवाबदारीचे  विश्लेषण केले आणि माझ्या समोरच्या सर्व पर्यायांचे  पृथःकरण. मी डिप्लोमा केल्याने मला होण्याऱ्या फायद्यांची इतकी मोठी यादी माझ्या समोर कोणीच  ठेवली नव्हती. आणि आवेशसाठी पण हाच पर्याय निवडला असता असे म्हणून तर काकांनी आम्हाला निर्णयाजवळ जाण्यास मदत केली. मी काकांचे आभार मानले आणि विचार केला कि किती कळकळीने आलेत ते आणि समजवले पण !! मी त्यांना आयुष्यभरासाठी लक्षात ठेवीन असा मनाशी निर्धार केला.

काही महिन्यांनी अकोल्याला आलो.  डिप्लोमाला 
admission झाल्यानंतरची माझी पहिली चक्कर. मित्रांची जत्रा जमली. माझ्या नव्या शहराच्या गमती, त्यांच्या नव्या tuitions च्या वेळा आणि जागा यावर मनसोक्त गप्पा झाल्यात. कुणीतरी आवेश चा विषय काढला. त्याला science मध्ये जागा मिळाली. मी जरा आश्चर्य चकित झालो, " अरे तो तर commerce  घेणार होता ना ??" 

" नाही रे. तू डिप्लोमा ला गेलास. आणि List मधे तुझ्या नंतरचा candidate अकोला सोडून जाणार होता. Waiting list मधे आवेशचा number पहिला होता त्यामुळे तुम्ही  दोघांनी admission न घेतल्यामुळे त्याला admission मिळाली ना तिकडे !!"

बाप रे !! मला काकांच्या उपकारांच ओझ जास्त वेळ वाहाव लागल नाही. पण त्याच्या अश्या वागण्याचा राग नाही आला, भीती वाटली.  आपण या पुढे कोणाच्या सल्ल्यामध्ये  स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. आश्चर्य आवेशच पण वाटल त्याला असली मानसिकता पटली पण आणि निमूटपणे तो त्याचाच भाग झाला !!!!

आयुष्यात पुढे काय करणार यापेक्षा काय करायचे नाही याचे हे असे नि:शुल्क शिकवणी वर्ग असतात, फक्त डोळे उघडे ठेवून शिकायचं !!! Thanks Kaka !!!!

(सत्य घटनेवर आधारित )

अमित जहागीरदार
१९ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा