रविवार, ८ मे, २०१६

कणखर मना

कणखर मना 

अगदी पक्क झालंय आता. माझा अंदाज इतका चुकायचा नाही. रुचिताच ती ! आमच्या शाळेत होती. एकदम हुशार, प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये भाग घेणारी अशी चुणचुणीत मुलगी.  इतक्या  वर्षानंतर ती मला भेटली होती पण ती इथे कशी याचा विचार आला कारण घरावर वेगळ्याच नावाची पाटी होती.

मी ज्यांच्याकडे मागल्या आठवड्यातच राहायला आलो होतो,  त्या काकूंकडे चौकशी केली आणि कळले कि रुचिता लग्न करून समोरच्या परांजपे कुटुंबात काही महिन्यांपूर्वी दाखल झाली होती. सकाळच्या धामधुमीत जाण्यापेक्षा संध्याकाळी भेटावे असा विचार करून मी बाहेर पडलो. पण दिवसभर मला तिच्याच गोष्टी आठवत होत्या. तिचा अभ्यासातल्या प्रगतीचा आलेख, भाषणातला आवेग आणि वाद-विवाद स्पर्धान्माधला आवेश सगळाच. शाळेत मस्त्या करतांना पकडल्यावर कित्याकदा तिच्या प्रगतीचे दाखले देवून आमचा सत्कार व्हायचा- घरी सुद्धा !!

कामाच्या व्यापात संध्याकाळ झाली.  घरी येवून कधी तिला भेटतो असे झाले होते. शाळेच्या मित्र मैत्रिणींना भेटायची मजा  काही और असते. आपल वय काहीही असो पण शाळेतले विषय निघाले कि अगदी लहान झाल्यासारखं वाटत.

रुचिताच्या घरी गेल्यावर तिच्या सासऱ्यांनी दार उघडल चौकशी केली आणि रुचिताचा वर्गमित्र म्हणून बाकीच्यांशी ओळख करून दिली. माझा अंदाज चुकला होता , ती आणि तिचा नवरा बाहेर गेले होते. १०-१५ मिनिटात येतील असा कयास करून माझ्यासाठी चहा करण्यात आला. तिच्या सासरच्या मंडळींनी तीच खूप कौतुक केल. शाळेतल्या तिच्या पराक्रमाचे मी पण पाढे वाचलेत. अस बघायला मिळत नाही कि मुलीच्या पात्रतेची दाखल तिच्या सासरचे पण घेतात !!

माझा हा विचार कोता आहे हे मी ठरवण्याच्या आताच तो दोघे आलीत. रुचिता  मला बघून गोंधळून गेली कारण तिला लक्षात राहावे असले marks  मला कधी पडले नव्हते. मग मी तिला ओळख दिली आणि ती एकदम फुलली. शाळेच्या गप्पा झाल्यात, शिक्षकांची विचारपूस, घरच्यांचे हालहवाल सगळे झालेत. तिचा नवरा अनिकेत जास्त बोलत नव्हता, कदाचित थकला असेल !! पण आमच्या गप्पा चालूच होत्या.  अनिकेतच्या आईने आग्रह केला तर मला जेवणाचे निमंत्रण नाकारता आले  नाही. जितकी हुशार अभ्यासात तितकीच ती घर manage करण्यात तरबेज होती हे मला कळायला जास्त वेळ नाही लागला. एकंदरीत सगळा व्याप तिने सांभाळला होता. नोकरी करून हे सगळ ती सांभाळायची याच कौतुक माझ्या पेक्षा तिच्या घरच्यांना होत हीच मोठ्ठी गोष्ट !!

अनिकेत मात्र शांत होता मला त्याचा स्वभाव काळात नव्हता. बायकोचा मित्र म्हणून मला चाचपून बघतोय का असा संशय येत नव्हता. पण मी त्याला जास्त seriously घ्यायचं नाही अस ठरवलं. तसही मैत्रिणीच्या नवऱ्याच व्यक्तिमत्व खूप जास्त छाप पाडू शकत नसत !!
जेवण झाल, निरोप झालेत, रुचीताच्या सासू आणि सासऱ्याने पुन्हा येण्याच आमंत्रण दिलं. फाटका  जवळच्या गप्पा पण झाल्यात, रुचिता म्हणाली कि तुला भेटून शाळेतले दिवस आठवले आणि मी अगदी लहान झाले. मी तिला पुन्हा चिडवले कि ते आठवून आम्हाला वाटत कि आमचे काय हाल होत होते तुझ्या प्रगतीपुस्ताकामुळे !! एकदम प्रफुल्लीत झालेला तिचा चेहरा पडला पण मला कळायच्या आत तिने विषय बदलला.

मग येण  वाढल, गप्पा वाढल्या, रुचिता कळली, तिचे प्रोब्लेम्स कळलेत. अनिकेत हा एक परावलंबी माणूस आहे हे कळल. फक्त ऑफिस  मध्ये जावून पगार आणतो कारण शिकलाय ! बाकी व्यवहार नाही कि शिष्टाचार नाही काही काही त्याला जमत नाही. आधी आईच्या म्हणण्यानुसार सगळ करायचा आता बायकोच्या फक्त त्याच्या घरच्यांना तो बायकोच ऐकतो यावर आक्षेप नाही कारण त्याचा निभाव लागतोय हे समाधान !!
मी तिला विचारले," तू सहन कस करतेस ? सगळी काम तुझ्यावर पडतात."
ती म्हणाली, " काय करणार? त्याच्याशी बोलणार तरी काय ? त्याला विचार करायची सवयच नाहीय. त्याने पण कधी करून घेतली नाही . निभावलं ते निभल बाकीच माझ्या नशिबी !!"
"काही दिवसांपूर्वी माझ एक operation  झाल. तपशील देवू शकत नाही सगळे  पण एकच गोष्ट सांगते मला आधार देण्या ऐवजी हा स्वत: रडत बसला होता."
मी त्याला बोलले देखील कि -

"लग्न म्हणजे एखाद खेळणं नाहीय. आधी तीन चाकी मग दोन चाकी cycle घेण्यासारखं अगदी वयाला साजेस !!फक्त वडिलांची ऎपत आहे म्हणून तुला खूप गोंडस खेळण मिळेल अस नाहीय आणि मिळालं  तरी तुला त्याचं  जतन करायची जवाबदारी झटकता येणार नाही . .  जवाबदारी . . बाप रे काय कठीण आहे तुझ्यासाठी !!!
 एका समजूतदार व्यक्ती सोबत राहण्याचा हक्क आहे मला ! गळ्यात हार घातले ते कुठल्याची परिस्थितीत हार न मानण्यासाठी !! अस भेकडासारख रडण्या साठी नाही . .

हे सगळे बोलले रे मी पण …. पण त्यामुळे फक्त त्याची रडण्याची गती वाढली, maturity  नाही !!"


" काय कराव तेच कळतच  नाही ? स्व:ताच्या पायावर उभी राहिलेली मी असला अधू नवरा घेवून जगावं लागणार या विचाराने कोमुजून जाते. आणि शरीराने अधू असता तर खपून घेतलं असत रे पण मनाने  कमकुवत असलेल्याला किती आणि काय धीर देवू. मी खचले तर आमच घरच बुडून जाईन."

मला तिला समजावणे कठीण झाले होते. काहीच सुचत नव्हते, काही बोलायला जमत नव्हत ! काय सांगू तिला ? काही हि न बोलता निघून आलो.

थोड्या वेळात आईचा फोन आला कि कधी office  मधून आलास ?जेवलास का ? थकलास का ?? तब्येतीला जप हा !! मी तिला दिनक्रम सांगितला आणि म्हणालो कि इतकी काळजी नको करून. तू मला स्वावलंबी बनवलं आहेस.

"हो ते तर आहेच तुझ्या तब्येतीची काळजी वाटते मनाने तर तू आमच्यापेक्षा सक्षम आहेस, कणखर आहेस!!"

मी फक्त thanks  म्हणालो आणि फोन ठेवून रडू लागलो.

- अमित जहागीरदार
  ८ मे  २०१६
  Mother's  Day
 (काल्पनिक कथा आणि पात्र -  कथेशी, कुणाचाही संबंध नाहीय. असला तरी बोलून दाखवू नका !)

जवळची मैत्रीण

जवळची मैत्रीण

वेळ संध्याकाळची होती. आकाशात ढग दाटले होते पण सकाळी या असल्या वातावरणाची पुसटशी देखील कल्पना नव्हती. सकाळी स्वच्छ ऊन पडून एका दिवसाचा जन्म झाला होता पण दुपारी ढगांनी गर्दी करून अवेळी पावसाची वर्दी दिली होती. आवेश रोज च्या प्रमाणे office  मधून निघायची तयारी ७ वाजल्या पासून करत होता पण कामाच्या गर्दी मुळे त्याला निघायला उशीर होत होता. बाहेर पडे पर्यंत पावसाने  त्याचे स्वागत केल. घरी जायला गाडी असल्यामुळे पावसात भिजायला मिळणार नाही याच त्याला खरतर दु:ख वाटत होत. खरच किती कमाल असते - ज्या वेळी आवेश दुचाकीने फिरायचा तेव्हा पावसात भिजण्याचा कंटाळा यायचा आणि त्याला नेहमी वाटायचं कि चारीचाकी कधी घेईन  आणि या भिजण्यापासून  मुक्त होईन. पण आज अचानक त्याला आठवले कि पावसाचा स्पर्श किती दिवसाने झालाय . ज्याला आपण मोठे होणे म्हणतो ते कधी कधी आयुष्यातल्य छोट्या छोट्या  गोष्टी पासून आपल्याला खूप दूर नेत.

या विचारामधून बाहेर पाडण्यासाठी एक कारण म्हणून गाडीने काही तरी आवाज काढला. गाडीची काच खाली करून आवेश बाहेर बघू लागला. त्याच्या लक्षात आल  कि समोरचं चाक  पंक्चर झालाय !! म्हणजे आवेश ला आज पावसाचा आनंद जबरदस्ती घ्यावा लागणार !! बस stop च्या आडोशाला गाडी घेवून तो बाहेर निघाला पावसाचा जोर थोडा कमी झाला होता त्यामुळे भिजण्याची भीती नव्हती.

गाडीचे काम करता करता त्याच्या लक्षात आले कि bus stop वर एक सुंदर मुलगी उभी होती. पावसापासून स्वताला वाचवत होती आणि बसच्या प्रतिक्षेत असलेली ती अजून सुंदर दिसत होती. आवेश ने स्वताला सावरल आणि विचारातून बाहेर आला आणि गाडीच्या कामात लक्ष देवू लागला. पण त्याच्या मनात वेगळाच विचार आला. इतक्या पावसात आणि इतक्या उशिरा बिचारी एकटीच थांबली अहे.

गाडीचे काम करून त्याने एक कटाक्ष तिच्यावर टाकला. ती अजूनही भांबावलेली दिसत होती आणि थोडी चिंतातूर हि. आवेश ने थोडी  हिम्मत केली आणि तिला विचारले कि तुमची हरकत नसेल तर मी सोडून देतो.

एकदम अनोळखी माणसासोबत कस जायचं हा विचार तिच्यापण मनात येईल हे हेरून आवेश ने तिला कंपनीचे आइ कार्ड दाखवले आणि मोबाईल नंबर पण दिला . माझा फोटो काढून घराच्या कोणातरी पाठवून द्या हि कल्पना आपल्याला सुचली याच आवेशला कौतुक वाटलं. पण सुचेता ला हे सगळ ऐकून हसू येत होत. हो तीच नाव सुचेता होत . ती अवेशच्या गाडीत बसली आणि आपला फोन बंद झाल्यामुळे तिने आवेशाच्या मोबाईल  वरून नवऱ्याला  फोन केला. होय नवऱ्याला !!
आवेश थोडा हिरमुसला आणि मग त्याला आठवल कि आपण हि घरी फोन करून सांगाव कि निघालो म्हणून !!

काहीपण असो पावसात एक छान मुलगी आपल्या गाडीत बसली  आहे याचा त्याला उगाच अभिमान वाटत होता . नाव, गाव, पत्ते, कामच ठिकाण आणि स्वरूप याची देवाण  घेवाण झाली आणि ४० मिनिटांचा तो प्रवास संपला. सुचेताला तिच्या घराजवळ सोडून आवेश घरी आला. बायकोला सगळी हकीकत सांगितली सुचेता सहित ! फक्त ती गाडीत बसल्यावर झालेला आनंद सांगितला नाही पण त्याच्या बायकोने त्याला चिडवले कि लग्नानंतर तसाही तुला दुसऱ्या  कुणाला लिफ्ट देण्याची गरज पडली नाही.
आवेशने अवंतीला सगळ सांगितलं काही लपवल नाही.
सुचेता आणि आवेश आता नियमित पणे  भेटू लागले, कधी दुपारचे जेवण तरी कधी संध्याकाळची coffee !! कधी office  गप्पा तर कधी आवडीचे विषय छंद सगळे बोलून झाले मग घराच्या गोष्टी !! नवऱ्याबद्दल अगदी आदराने बोलणारी सुचेता हळू हळू त्याच्या स्वभावातले कंगोरे उघडपणे दर्शवू लागली. आवेश आणि सुचेता ला हि जाणीव जरूर होती कि आपण फार जवळ आलोय पण यात प्रेम वगैरे काही नव्हत म्हणजे आवेश तर त्यांच्या भेटीतल्या सगळ्या गोष्टी अवंती ला सांगत असे. त्यांनी कधी असले बंधन ठेवले नाही

सुचेताने मात्र कधी आवेश आणि त्याच्या सोबतच्या भेटींचे कुठलेच तपशील नवऱ्याला  सांगितले नाहीत.
बोलता बोलता  हि गोष्ट जेव्हा आवेशला कळली तर त्याने तिला विचारले सुद्धा तू त्याला काहीच का सांगितले नाही.
सुचेताने त्याला समजावले कि एका लग्न झालेल्या मुलीने दुसऱ्या कुणाशी केलेली मैत्री समजावून घेण्या इतके त्याचे मन मोठे नाही आणि त्यासाठी मी तुझ्या सोबत ची मैत्री सोडू शकत नव्हते. आपल्या मैत्रीत कसलीही अशुद्धता नव्हती म्हणून मी पण त्याला उगाच सांगण्याच्या आणि समजावण्याच्या चक्रात अडकले नाही.

ते बोलणे तसेच सोडून आवेश घरी आला, कामात गढून गेलेल्या अवंतीला मिठीत घेतले आणि म्हणाला कि, " सगळ्यात छान आणि जवळची मैत्रीण तर तू आहेस !!"

- अमित जहागीरदार
  ८ मे २०१६