मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 3---- Bhasha

भाषा --- मानवाच्या संस्कृतीचे आणि उन्नतीचे प्रतिक. पण प्रेमाला भाषा नसते.  डोळ्यातल्या प्रेमाला वाचायला तसेच भाव असलेले दोन डोळे पुरेसे असतात. आधी मला  पण असेच वाटायचे पण जेव्हा कावेरी ची गोष्ट कळली तेव्हा कळले कि भाषा खूप महत्वाची असते .. अगदी प्रेमात सुद्धा......................


कावेरी सांगली मध्ये  शिक्षण आटपून पुण्यात नोकरीसाठी आली. चांगल्या नोकरी सोबत  एखाद्या
foreign  langauge ची जोड म्हणून German शिकायचे ठरवले.
कुठल्याही भाषेचा अभ्यास करण्यासाठी सोप्पा मार्ग म्हणजे त्या भाषेतल्या  साहित्याचा अभ्यास करणे. कावेरीला german शिकवणाऱ्या madam ला हि गोष्ट अगदी व्यवस्तीत ठावूक होती. म्हणून त्यांनी क्लासमधल्या सगळ्यांना वाचायला german  साहित्य दिलं. काही कविता, काही नाटकं   madam नी  विद्यार्थांच्या ग्रुपस ला दिलीत म्हणजे त्यांना ते वाचता वाचता भाषेचा अभ्यास पण करता येईल. कावेरीला एक छानस romatic नाटकं मिळाल अगदी रोमेओ-जुलीअत सारख !! आणि मनीष सारखा एक पार्टनर मिळाला ज्याचा ढंग फार निराळा होता. ती खूप serious होती तर तो just एक वेगळा अनुभव म्हणून शिकायला आला होता. पण तिच्या  उत्साहाकडे बघून त्याने पण मन लावून german शिकायचं ठरवलं.
नाटकामध्ये कित्येक प्रसंग हे प्रेमाच्या उत्कट  भावनाची वीण असलेल्या  विचारांवर आधारित होते. दोघेही तसे प्रेमाच्या प्रांतात नवीन होते. किंबहुना त्यांनी फक्त फिल्म अथवा कादंबरीतून प्रेमाचा गंध घेतला होता.. ( स्वाद नाही)  प्रेमाच्या त्या ओळींच्या ओलाव्यात भिजत नाटकाचा अर्थ समजावून घेता घेता काही थेंब अंगावर  नक्कीच पडत होते....पण दोघेही खूप focused होते म्हणून शब्दातले भाव फक्त मेंदूपर्यत पोहोचत होते मनाला भिडत नव्हते.

तिकडे नाटकाचा एक छोटा भाग सदर करण्यासाठी प्रत्यक्ष प्रेम सोडून प्रेमासारख सगळच कराव लागल. हातात हात घालून प्रेमाच्या आणा भाका पण घेतल्या गेल्या.
टाळ्यांच्या कडकडाटात मिळाली दाद हि नाटकाला अथवा आपल्या सादरीकरणाला होती असा समाज करून दोघेहि मनातल्या खऱ्या भावनांकडे बघेनासे झालेत. पण तो पर्यंत त्यांच्यामध्ये छान मैत्री फुललेली होती. 
कावेरी त्याच्याकडे एक अन एक गोष्ट share करू लागली. नोकरीची निवड, आई बाबांसाठी चे गिफ्ट्स आणि तिच्या  ड्रेसचे रंग सगळे सगळे मनीषच्या आवडीचे. तो पण त्याचा व्यवसायातून वेळ काढून तिला भेटायला  मुंबईतून पुण्यात येवू  लागला.
कावेरीच्या नोकरीच सगळ सुरळीत झाल्यावर तिच्या घरच्यांनी रिती प्रमाणे तिच्या  लग्नाची गोष्ट तिच्यासमोरच काढली. एरवी स्पष्ट आणि मोकळ्या मानाने बोलणारी कावेरी या विषयावर काहीच बोलायची नाही. तिला फक्त अस्वस्थ वाटायचं आणि नाटकातले एक दोन प्रसंग डोळ्या समोर यायचेत. लग्न आणि त्याच्यातल्या बाकी गोष्टींपेक्षा तीला प्रेमाच आकर्षण जाणवू लागल . मनात प्रश्न येवू लागले कि हे काय असत आपण जे अनुभवलं होत अगदी तसाच असत का ??
 पण या सगळ्यांचा अर्थ काही कळत नव्हता.
 एव्हाना मनीषच्या पुण्यातल्या  चकरा वाढल्या होत्या. असाच एकदा तो आला असतांना मनीष समोर हा विषय निघाला आणि  कावेरीने घरच्यांचे plans त्याला सांगितले . मनीषने  सुद्धा याच  भावनांच्या  गुंत्यात आपणही अडकलो आहोत याचा खुलासा केला. याचा अर्थ काय हे प्रश्न दोघांना पडले.. लग्नाचा विषय निघाला कि मनीषच्या डोळ्यासमोरचे  तेच नाटकातले येत होते आणि त्याला एकाच प्रसंग आठवत होता - त्याच्या हातात येणारे  कावेरीचे  हात.

काही दिवसांनी मनीष पुह्ना पुण्यात आला. दोघेही  नुसते अर्थ कळून घेण्यापेक्षा या अनुभवाचे येणाऱ्या उद्याशी काही संबंध जोडला येतील का असा प्रश्न मनीषने केला आणि कावेरीला त्या वेळी इतक्या दिवसांमधल्या पडलेल्या प्रश्नांचे उत्तर मिलाले. 

साठे madam च्या शिकवण्याचा वेगळ्या पद्धतीचे फायदे समजायला नाटकाची तेव्हा केलेली  पारायण आणि नंतरच्या दिवसांमधले त्याचे उमगलेले अर्थ आज फलित झालेत.. मनातले  बोलायला त्यांना जास्त वेळ लागला नाही. मनीषने तिला नाटकाच्या प्रसंगाचा आधार घेवून german भाषेत विचारले कि तू माझ्या सोबत तुझ पूर्ण आयुष्य घालवशील का ?? 




नाटकातले सगळे संवाद जिभेच्या टोकावर नाचत असतांना तिने प्रेमाच्या सगळ्यात पहिल्या भाषेचा आधार घेतला.. डोळ्याच्या भाषेचा ... मनीषला कळले...


प्रेमाला जरी भाषेची गरज लागत नसेल तरी पण भाषेच्या सपोर्टची गरज नक्कीच असते........................


अमित जहागीरदार
२०११

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

Samanya ani asamanya

पुष्कळदा काही असामान्य लोकांकडे बघून वाटत की ही लोकं नक्की काय वेगळ करत असावी. त्यांच्याबद्दल  हेवा, द्वेष, मत्सर, कुतूहल, प्रेम काही पण जोडीला असलं तरी असामान्य लोकांना बघून हा प्रश्न येतोच. आणि मग तर कुणाच आत्मचरित्र वैगैरे वाचलं की लक्षात येत ते पण आपल्यासारखेच सामान्य आयुष्य जगणारे  असतात..... मग वेगळ असत तरी काय??

मला वाटत वेगळा असतो तो त्यांचा विचार करण्याचा pattern . म्हणजे आपल्या पण आयुष्यात तश्याच घटना घडत सुद्धा असतात पण आपण त्याला ज्या पद्धतीने react होतो तीच बहुदा ठरवते आपला सामान्यापणा !!

A P J च्या लहानपणाची गोष्ट वाचली कि ते एका झाडावर चढले होते काही मित्र मैत्रींनी सोबत आणि अचानक जोराचा वारा  सुटला. बाकी मुलांचे पालक त्यांना सांगत होते कि झाडाला पकड नाही तर पडशील !! पण APJ  च्या वडिलांनी सागितले कि तू जर नीट झाडाला पकडले तर पडणार नाहीस......

Positive  गोष्टींचा परिणाम खूप मोठ्ठा असतो आणि मनावर खोलवर बिंबवल्या जातो... असे केले नाही तर हे होणार नाही या गोष्टींचा लहानपणा पासून भडीमार होत असतो ... अभ्यास केला तर पास होशील म्हणणारा मला भेटलेला नाही.
नाही केलास तर नापास होशील हि भीती प्रत्येकाने दाखवली... 

जर आपण मुळातच positive  विचार करत नाही तर मग नंतर कुठून येणार.. मोठी मोठी पुस्तके वाचून ?? त्यात फक्त rapper छान आणि देखण कसं करता येत ते सांगतात.   

असामान्य माणसाचं वैशिष्ठ त्यांच्या परिस्थिती पासून वेगळाच संदेश घेण्यात असतं.
आपण ज्या गोष्टी मध्ये काहीच शोधू शकत नाही त्याच ते खूप मोठे अर्थ शोधतात.  त्यांच्या आयुष्यातले प्रसंग म्हणजे एक Metaphore असतात .. बोधपूर्ण ! पण बोध शोधावा लागतो. आपल्याला प्रत्येक कथेच्या मागे कृती काय हे सांगाव लागत.
नाही तर आपण दासबोधासारखे पारायण करतो पण आचरणात आणण्यासारख काहीच नसते....

मला एक प्रसंग आठवतो.. माझ्या जुन्या कंपनी मधला ! ऑफिसला  जाताना थोडा उशीर झाला म्हणून मी एक दोन turns वर माझ्या वेगाचे प्रात्यक्षिक दाखवत  पार्किंग मध्ये दाखल झालो. HR चे एक मोठ्ठे अधिकारी माझ्या दिशेने चालत येत होते . punching  ला किती मिनिटे बाकी आहेत याच गणित मनात चालू असतांना त्या अधिकाऱ्या  कडून काय काय आणि किती वेळ ऐकावं लागणार याचा मी हिशेब मांडत होतो. कोण? कुठला? dept  कोणते? हि चौकशी झाल्यावर त्यांनी directly  घरी कोण कोण असते हा प्रश्न विचारला. तुला काही झाले तर त्यांना काय वाटेल ? किती त्रास होईल? असले प्रश्न मला अपेक्षित नव्हते . कंपनीच्या नुकसानच एखाद कोष्टक मला देतील अस वाटल पण हा विचार खूप वेगळा होता. माझ्या संकुचित विचारांच्या झेपेपलीकडचा !!

मला विचार करायला लावणारे ते शद्ब तसे रोजचे पण वाटले असते पण तिथे थांबल्या मुळे मला एक असामान्य विचार गवसला. 

आजूबाजूला घडणारया साध्या गोष्टींमध्ये काही नवे क्रांतिकारी विचार दडलेले असू शकतात .. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला सुद्धा एखादा असामान्य विचार भेटू शकतो ! फक्त आपल्याला डोळे आणि डोकं ओपन करून फिरावं लागेल.



अमित जहागीरदार
पुणे
११ ऑगस्ट २०११

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

Tit for Tat.... new perspective

काल एका मित्राचा फोन आला होता. त्याने त्याच्या एका नातेवाईकाला कसे Tit For Tat  केले याच रसभरीत वर्णन तो देत होता. बरेच दिवसांनी हा विषय निघाला होता आणि मला एक श्रोता सापडला होता .. माझा जगावेगळा फंडा सांगायला.

आपण "जसाश तसे" म्हणतो खरे पण हे सगळी कडे करता येत नाही. हा म्हणजे कुणी आपली खोडी केली, आपल्याला दुखावलं तर आपण तसाच पलटवार करायचा. हे करण तसं सोपंच ना. म्हणजे  वाईट वागण म्हणजे फक्त नक्कल करणे. आणि मुळात वाईट गोष्टींची नक्कल आपण लहानपणा पासून लवकर करत आलोय. त्यामुळे समोरचा जस वागतोय त्याला उत्तर देण तितकंसं कठीण नाही.
पण खरी पंचाईत तेव्हा होते जेव्हा समोरची व्यक्ती चांगली वागते. आपण कितीही ठरवले तरी ठरवून  चांगले वागणे तेवढे सोप्प नाही. त्यासाठी मुळातच चांगल असावं लागत. पण वाईट वागायला अस काही बंधन नाही. पटत नसेल तर एक सोप्प उदाहरण बघा - आई .. ती किती चांगली वागले आपल्याशी पण तीच्या सारख आपण नाही ना वागू शकत. छोट्या छोट्या गोष्टींची इतकी काळजी घेण जमेल का आपल्याला ??
अगदी मनापासून करायचं ठरवलं तरी पण जमणार नाही. तसच कुणी दुसरी व्यक्ती छान वागली की आपल्याला ते रिफ्लेक्ट करता आलं पाहिजे. करण्यासाठी आपल्या मनाचा आरसा स्वच्ह असायला हवा. म्हणजे आता अस बघा ना एखादा सरकारी ऑफिस मधला अथवा  बँकेतला  कर्मचारी , बसचा कॅन्दाक्तर किंवा तत्सम पंथातले लोक ( लोकायुक्ताच्या कक्षेतले ) जर छान वागले तर एकदम धक्काच .बसतो आणि तोंडातून Thank you सुद्धा निघत नाही. तो अपेक्षाभंगच एवढा मोठ्ठा असतो.

परवा एका बँकेत गेलो तर घड्याळाचा काटा पाच वर गेला होता तेह्वा मनाची तयारी केली होती की काम तर होणार नाही पण एक-दोन मिनिटे थांबू या असे वाटले.  नंतर तो अधिकारी आला  आणि भिंतीवरचे अथवा हातातले घड्याळ न बघता त्याने माझे ऐकून घेतले आणि मला सांगितले कि पुढे काय करायचे. तो धक्का इतका मोठा होता कि मला माझे काम झाल्यासारखे वाटले. बाहेर जावून गाडी स्टार्ट करतांना आठवलं मी त्याचे  धन्यवाद सुद्धा मानले  नाहीत. पण त्यापेक्षा सगळे सरकारी कर्मचारी एक सारखे असतात हा समज ( कि गैरसमज  ) मनातून काढणे हे त्याला धन्यवाद म्हणण्या सारखेच ना !

मतितार्थ हाच की कुणाशी चांगल वागण हे आपल्यावर अवलंबून असत, कुणी तरी चांगला वागला म्हणून आपण तसाच वागू शकत नाही. कुणाला रिफ्लेक्ट कारण तितकस सोप्प नाही. काही आरसे प्रतिबिंब उंच दाखवतात काही त्याला जाड दाखवतात पण स्वच्छ आरसा हा  सुंदर प्रतिमा रेखाटतो. म्हणूनच प्रत्येकाला आपण आरश्यात सुंदर दिसतो. कारण आरसा फक्त मनातले विचार दाखवतो.

म्हणजे काय तर, जर आपण कुणाच चांगल वागण रिफ्लेक्ट करू शकत नाही तर मग वाईट वागण्यावर कशाला प्रतिक्रिया द्यायची. दुसऱ्या कुणाला त्या व्यक्तीच्या वागण्याचे नाही तर तुमच्या वागण्याचे आश्यर्य वाटेल.
तर मग  Tit For Tat  तेह्वाच करा जेह्वा आपण एखाद्या चागल्या गोष्टीची पण नक्कल करू शकू आणि ती पण मनापासून !!
आणि मग वाईट गोष्टींसाठी पण Tit For Tat  नका करू ... आपण आहोत तसेच वागू या आणि या पेक्षा छान होण्याचा प्रयत्न करू या...


अमित जहागीरदार
पुणे ८ ऑगस्ट २०११