शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 6- चाचू मुझे पसीने क्यू आ रहे है

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 6- चाचू मुझे पसीने क्यू आ रहे है


एखाद्या ठिकाणी आपण वर्षोन वर्षे राहतो पण परत तिथे आलो कि वाटत कि ते दिवस किती वेगळे होते. आता माझ असाच झाल. अमरावतीतल्या त्या भागामध्ये मी २-३ वर्ष राहिलो तेव्हा वाटल कि ह्या आठवणी मनात साठवतोय पण या कधीच मनातून जायच्या नाहीत. पण आज जवळपास १० वर्षाने इथे आलो तेव्हा लक्षात आल कि फक्त काही गोष्टीच नेहमीसाठी मनाच्या कप्प्यात राहतात, बाकीच्या गोष्टी काळानुसार हवेत विरून जातात.
मी राहायचो तिथे एक भास्कर वतनदार राहायचे. त्यांचे घर अजून तिथेच आणि तसेच होते म्हणून मी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. तसाही माझा जास्त वेळ मी माझ्या घरी आणि  त्यांच्या घरीच घालवायचो. कारण विभा ताई -त्यांची मुलगी ! ती माझ्यापेक्षा 3 वर्षाने मोठी होती. पण अभ्यासात  खूप हुशार होती आणि  जवळपासच्या मुलांना अभ्यासात थोडी गोडी यावी म्हणून classes घ्यायची. त्यामुळे मी पण तिला ताई म्हणायचो.  तिचे लग्न आमच्याच घरासमोर एक अधिकारी कुटुंब राहायचं त्यांच्या स्वानंदशी झालय.

मी सहज गेलो तर काय नशीब ! विभा आणि स्वानंद दोघेही आले होते. मग गप्पांच फड रंगला. पहिले मी विभाताई आणि काकाच होतो गप्पा मारत आणि मग  स्वानंदपण आला आमच्या मधे .

काका लगेच उठले आणि त्यांनी पंखा चालू केला -
जावई बाप्पुंना घाम येईन . असे म्हणून दोघे ही हसले. मी याच्या आधीपण काकांनी असा विनोद करतांना बघितलं होत. मी काकांना विचारलं सुद्धा हे पंख्याच काय प्रकरण आहे. तुह्मी स्वानंदला एक दोन वेळा पंख्यावरून आणि घामावरून चिडवले हे माझ्या लक्षात आहे. काका आणि  स्वानंदला बाहेर जायचं होत म्हणून ते गडबडीत निघालेत. विभाताई आणि मी बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो. माझी नोकरी, नव शहर यासगळ्या गोष्टी चर्चून झाल्यात पण मला अजूनही याच उत्तर मिळालं नाही कि ती पंख्याची आणि घामाची गोष्ट काय आहे. विभाताईने माझ्या चेहर्यावरून माझ्या मनातल्या प्रश्नांची कल्पना आली असावी.

विभाताई हसली आणि गोष्ट सांगू लागली
अधिकारी कुटुंब आपल्या भागात shift  झालेत, आमच्या घरच्यांशी ओळख झाली येण- जाण चालू झाल, परीचय वाढला मग कळल कि अधिकारी काका पत्रिका बघायचे आणि लग्न जुळवायचेत. त्यावेळी माझ लग्न करायचं अस चालल  होत. स्वानंदशी ओळख झाली होती पण माझ्यासाठी तो एक शेजारी होता पण आजकाल तो जास्त वेळा भेटत होता. माझ्यासाठी आलेल्या प्रत्येक "ठिकाणा" ची माहिती आली कि बाबा ती अधिकारी काकांकडे पाठवायची. काका ती माहिती आणि पत्रिका बऱ्याचदा स्वानंदच्या हातून पाठवायचे . मग एखादी माहिती पडताळण्यासाठी अधिकारी काका कधी कधी स्वानंदलाच पाठवायचे. प्रत्येक वेळी स्वानंद घरी यायचा तेव्हा घामाने लदबदलेला असायचा. स्वानंद घरात आल्याबरोबर पहिले पंखा लावावा लागायचा. आम्ही सगळे आतल्या खोलीमधून त्याची हि गम्मत बघायचो आणि हसायचो. एक दोनदा तर बाबा घरी नसल्यामुळे मी एकटीच त्याच्या बऱ्याच श्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. एकदा मी त्याला विचारले पण कि अरे तुला इतका घाम का येतो ??
काही न बोलता घाम पुसत निघून जायचा.
 BSc नंतर मला पुढे शिकायचं होत . बाबांनी खुप आग्रह नव्हता धरला पण जमायला 1-2 वर्ष लागतात अस ग्रुहित धरून मी देखील होकार दिला. पण लगेच ठरू नये असे मनात पक्क केल होतं.  आलेल्या स्थळाला नकार देण्यासाठी मला काहीना काही कारण मिळायचं आणि मी प्रत्येक वेळी लग्नाला नकार द्यायची. 

मी सांगितलेल्या सगळ्या सबबी माझ्यावर एकदा उलटल्या. आता अधिकारी काकांनाही कळले होते कि मी कोणती proposal  नाकारते मग त्यांनी ती सगळी जुळवा जुळव करून एक अस स्थळ सुचवाल कि नाही म्हणायला scope  नाही.
सगळे तपशील स्वानंद ला सांगून काकांनी त्याला आमच्याकडे पाठवले. डिसेंबरचे दिवस होते आणि  कडाक्याची थंडी होती पण स्वानंद घरी आला तेव्हा घामाने न्हावून निघाला होता. मी आश्चर्य चकीत झाले होते घरात दुसर कोणीच नाहीय हे त्याला माहित नव्हत म्हणून तो बिचारा मला सगळ सांगू लागला कि हे स्थळ खूप चांगल आहे आणि पत्रिका पण जुळते. मी थोडी लाजली . स्वानंद घामाने माखला होता आणि मला काय करावे ते सुचत नव्हते त्याच्या बोलण्यामागे भीती पण होती की ह्या स्थळाला नकार देता येणार नाही असे अधिकारी काका म्हणत होते. 

मी सवयीने पंखा लावला आणि स्वानंदसाठी पाणी आणले. मला त्याला विचारायची इच्छा होती की तुला घाम का येतो रे पण आज तो जरा गंभीर दिसत होता. मी पण तो समोर बसलाय हे विसरून स्वतः शी बोलत बसले, "किती विचीत्र आहे.  नाही?  पत्रिका बघून, जुजबी माहिती पडताळून कुणाला सोबत आयुष्य घालवायच.  आणि या  process  वर विश्वास ठेवायचा कारण आपल्या आई-बाबा , आजी- आजोबा सगळ्यांनी हेच केल .
यात कुठेच प्रेम,  जिव्हाळा एकमेकांना ओळखणे ??  हे सगळ मिथ्थ्या वाटत. 
बोलता बोलता माझ्या लक्षात आल कि स्वानंद तिथेच शांतपणे सगळ ऐकत होता. आणि त्याचा घाम  देखील सुकला होता !!

तो म्हणाला कि कधी कधी प्रेम अगदी जवळपास असत पण आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही.
तो म्हणाला कि कधी कधी प्रेम समोर असत पण आपल्याला दिसत नाही, कळत नाही. मी त्याच्या असल्या बोलण्याने अवाक् झाली होती. 
त्याने बहुदा माझा चेहरा वाचला हवा आणि बोलला कि आता हेच बघ ना तुझ्या लग्न आता जुळणारच असा बाबांना विश्वास असतो आणि तू मात्र काही ना काही  कारण काढते. मला जाम वैताग येतो पण वाटत एकदा मी हिंमत करेन आणि एकदा माझी पत्रिका पण जुळते का ते बघेन पण शब्द बाहेर येण राहिल बाजुला नुसता घामच येतो. 

मला हसू पण येतो होत आणि आश्चर्य याचं वाटत होत कि त्याने ते सगळ बोलुन पण दाखवल. मला impress व्हायला आणि थोडा लाजायला हे पुरेसे होत . तो तेवढ बोलून निघून गेला आणि मी बाबांची वाट बघत बसले. त्यांना कधी सांगते अस झालं होत मला.  पुढे सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. आमच लग्न ठरलं आणि झाल देखील.

 पण अजूनही स्वानंद आला कि आम्ही त्याला घाम आणि पंख्यावरून चिडवतो.
अशी ती आगळी वेगळी गोष्ट विभा - स्वानंदची !!

१५ ऑक्टोबर २०१५

शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

प्रेमाची पहिली शिकवण


आज अचानक एक गोष्ट आठवली. साधारण तीन चार महिन्यांपूर्वी आमच एक गेट टुगेदर झाल होत. आमची  college ची मित्र मैत्रिणींची gang भेटली होती त्यावेळी college मध्ये कोणाला कोण आवडायचं याची यादी निघाली. विषय आवडीचा असल्यामुळे सगळ्यांनाच त्यात रस होता. कृतिकाचा नवरा जास्त लक्ष देवून ऐकत होता हे माझ्या लक्षात आल. मी त्याचा ताण हलका करण्यासाठी बोललो कि कृतिका कुठल्याच लिस्ट मध्ये नव्हती. ती पण उत्साहात बोलत होती कि माझ्या terror मुळे माझ्या मागे कधी कोणी लागल नाही. कृतिका पुढे म्हणाली कि मला हे प्रेम वगैरे जमल नाही पण समीर सोबत आहे म्हणून आमचा संसार चालू आहे.
बाकीच्या बऱ्याच गोष्टी झाल्यात पण मला तिचं ते वाक्य खूप बोचल. तिने प्रेम आणि संसार वेगळे ठेवलेत !!

आज हे सगळ आठवायच कारण अवनी . तिला नुकताच भेटून आलो आणि जवळपास दोन तास आणि चाळीस मिनिटे तिच्याशी वाद-संवाद झालेत. अवनी माझ्या एका मित्राची मुलगी. १७ -१८ वर्षाची पण माझी खास मैत्रीण. पहिल्या नोकरीच्या ठिकाणी अभय आणि माझी ओळख झाली. अभय पुण्याचा असला तरी घरी येण्याच आमंत्रण तो मनापासून देत असे आणि अश्याच त्याच्या एका आमंत्रणाला आम्ही नुकत्याच join झालेल्यांच्या group  ने मनावर घेतल. अभयने खूप छान बेत केला, नवीन office आणि नवीन शहर असल्यामुळे आम्हाला घरी असल्यासारखं वाटलं. त्यावेळी आमची ओळख एका छोट्या परिशी झाली - अवनी. अभय आणि वासंती ची मुलगी. तेव्हा अवनी ४-५ वर्षाची असेन. पण आमच्या मध्ये ती लगेच रुळली. माझ्याशी तिची खास गट्टी जमली. मग अभयकडे वरचेवर जाणं वाढल. अवनीला माझा लळा लागायला तेवढ पुरस होत. 
अवनीचा वाढदिवस असो वा त्याच्याकडचे कुठलेही function असो मी अभयच्या घरचा permanent सदस्य झालो. माझ्या shopping च्या लिस्ट मध्ये अवनी साठी काही ना  काही वस्तू असायची. माझ्या लग्नाच्या वेळी बायको आणि तिचे घराचे रडत असतांना आमच्याकडून अवनीने भोकाड पसरलं होत. तिला कोणीतरी सांगितलं कि आता काका तुझ्याकडे लक्ष देणार नाही आणि फक्त काकुचेच लाड करणार. अवनीला समजावणे कठीण झाले. अशी माझी आणि अवनीची मैत्री.

कुठल्याहि गोष्टीसाठी पहिले माझ्याकडे हट्ट  करणारी, सगळ पहिले मला सांगणारी आणि माझं ऐकणारी अवनी. अभय आणि वासंती वाहिनीने कधी यावर आक्षेप घेतला नाही कि अवनी माझ्याशी सगळ share  करते. फक्त कधी कधी त्यांची मत विचारात घेण्याची ताकीद मिळायची आम्हाला. तिचे छंद, शाळेच्या सहली, आवडी जपण्यासाठी तिला लागणारी मदत आणि घरच्यांकडून अपेक्षित स्वतंत्र ती माझ्या जोरावर मिळवायची.  पण आता थोडी मोठी झाली होती. तिला पण तीच मत होत आणि ते प्रदर्शित करण्याचा स्वतंत्राचा लढा तिने माझ्यापासून चालू केला.
पण गेल्या एक दोन महिन्यात प्रकरण जरा वेगळ वळण घेत होत. वासंती वाहिनी तिच्या चिडचिड्या स्वभावाची नेहमी तक्रार करत असायची. मला घरी येवून तिच्याशी बोलण्याची गरज आहे अस त्याचं मत होत. पण मला जमल नाही. शेवटी एके दिवशी मी वेळ काढून गेलो अवनीला माहित नव्हते मी कशा साठी आलो होतो ते. अवनी ने college च्या गप्पा चालू केल्या. नवे मित्र मैत्रिणी त्यांचे किस्से नवे नवे modern  विचार बराच काही. मग ती हळूच नाजूक विषयांकडे वळली.
अवनी- "काका, आमच्या क्लास मध्ये ३ couples  पण आहेत."
मी - "?"
"म्हणजे GF - BF रे. मी तुझ्या वयानुसार couple  म्हटलं. तुला कळव म्हणून. " तेवढ्यात तिने मला चिमटा काढला.
"अरे काका, आज काळ college मध्ये हाच माहोल असतो. हेच विषय असतात चघळायला."
मी - "गुड. मग तू शोधतेय तुझ्यासाठी एखादा BF ??"
अवनी- " काहीपण रे तुझ काका ?? मला अजून तसली गरज नाही आहे. आणि ते सगळ बोरिंग असत. fashion म्हणून करतात हे सगळ. fad असत फक्त. नुसता timepass. "

मला तिच्या बोलण्यात थोडा राग पण जाणवत होता आणि थोडी हि जाणीव कि मला हे सगळ आवडत
मला त्यात काही वावग वाटल नाही. बऱ्याच वेळा आपण ज्या गोष्टीच्या मागे लागतो पण ती मिळत नाही, ती आपल्याला नकोच आहे अस सांगत राहतो. ते सांगण दुसऱ्यांसाठी नसून आपल्याच मनासाठी असत. अवनीच पण हेच झाल होत. मी मात्र संभ्रमात होतो. अभय-वासंतीशी या विषयावरती काहीच चर्चा झाली नव्हती त्यामुळे मला या विषयावरती बोलायला कठीण झाले होते. त्यांच मत काय आहे याची मला पुसटशी पण कल्पना नव्हती. तसे मला ते orthodox कधी वाटले नाही.
पण हा विषय नाजुक होता.
आणि मी अवनीला काय सांगतो यावर तिचं जोडीदारच (एक अथवा त्यापेक्षा जास्त )आयुष्य अवलंबून होत. मी गोंधळून गेलो होतो पण मला त्यावेळी " मैरा नाम जोकर" मधला जॉनी आठवला जो त्याला तरुण पणाच्या गोष्टी विचारल्यावर म्हणतो मै भी कभी जवान था !! मला वाटत मँचुरिटी यालाच म्हणत असावे.

मी अवनीला विचारल, " आपण या विषयावर थोड बौलायच का? "
अवनी- " अरे बिनधास्त काका."

मी - "आणि फक्त तू आणि मी. ते पण मित्र आणि मैत्रीण म्हणून.सुरूवात मी करतो म्हणजे तुला पटेल की तुझा मित्रच बोलतोय." 

अवनी- "चालेल रे काका"

मी - "अवनी, प्रेम आयुष्यमधली सगळ्याच सुंदर आणि आवश्यक गोष्ट  आहे. ते अस ठरवून करता येत नाही आणि ठरवल तरी टाळता येत नाही. गमतीदार संदर्भ द्यायचा असेल तर ते अपघातासारख असत, पण अपघातात आपल्याला दुखापत होउ नये म्हणून जपतो. इथे मात्र ते दुःख देत नाही, हव हवस वाटत.

अवनी शांत पणे ऐकत होती.
"पण जेव्हा आपण प्रेम करतांना चुकतो तेव्हा त्रास आपल्यालाच होतो."

अवनी- "आणि चुकीच्या माणसावर ?. . "

मी हसलो, " आवनी प्रेम करताना समोरचा माणूस कसा आहे हा प्रश्नच नसतो. फायदा आणि तोटा हो व्यवहार झाला, ते लग्न. आणि...

अवनी- "म्हणजे तुला म्हणायचं आहे की प्रेम आणि लग्न वेगवेगळ्या गोष्टी आहेत??"

मी - "हो खुप वेगळ्या!! प्रेम होवून जात कळत नाही विचार करता येत नाही पण लग्न विचार करुन कराव लागत. ती कमिटमेंट असते आणि प्रेम डेडीकेशन् .
प्रेमाला व्यवहार कळत नाही. पण तुला आत्ता लग्न नाही तर प्रेम समजावून घ्यायचय."

अवनी- "काका पण प्रेम लग्नामधे कन्व्हर्ट झाल पाहिजे ना??"

मी - "लग्न म्हणजे सफल प्रेमाच प्रतिक नाही. तो यशस्वी संसार झाला. नियमांचे चोख पालन केलेला. पण प्रेमात नियम नाहीत. " 

अवनी- " काका थेअरी कळली पण हे सांग आता करायच काय? कॉलेज मधे गेल्यापासुन हेच बघतेय की प्रेम म्हणजे एक फँशन्. कम्पल्सरी विषय कॉलेज मधला." 

मी - "पण तुला अडवतेय कोण? होणार असेल तर होवू दे. पण तु ज्या लेव्हलच प्रेम करू शकते ते समजु शकणारा व्यक्ती पाहिजे ना. "

अवनी- "म्हणजे निवड आली ना काका??"

मी - "अग पण दान देताना सुद्धा देणाऱ्या एवधीच घेणाऱ्याची लायकी बघायची असते. त्याला ते सांभाळता पण आल पाहीजे ना? तू मनापासून प्रेम करशील तर समोरच्या व्यक्तीला तसच  प्रेम करता आल पाहिजे. आणि त्याची लायकी हि looks, धमाकेदार व्यक्तिमत्व, सगळ्याच्या गळ्यातला ताईत असणे हे गुण नकोत. हे सगळ fashin किंवा fad असू शकते. खऱ्या प्रेमाला लुक्स ची नाही हूक्सची गरज असते. "

अवनी- "आता हा काय नवीन फंडा ??"

मी - "हूक्स म्हणजे मनाला अडकणारे हूक्स. मनाला connect करणारे, जोडणारे हूक्स. ते जास्त महत्वाचे. एकाद्या सुंदर मुलासोबत चार चौघांमध्ये फिरताना खूप अभिमान वाटेलाही स्व: ताचा, पण एकांतात त्या सुंदर मुलाने  तुला चांगलं वागवल पण पाहिजे ना. तुझ्या मनातल त्याला कळल पाहिजे, मनाला जपता आला पाहिजे. "
अवनी- "काका तू मला एक वेगळाच विचार दिलाय. मी असा विचार केला नाही कधी. आणि आजूबाजूला हे सगळ इतक विचित्र पद्धतीत present केल्या जात आणि परत घरात काही बोलता येत नाही . मनमोकळ बोलता येत नाही, आई-बाबांना सतत जाणून घ्यायचं असत कि माझे मित्र कोण? आम्ही कुठे जातो? मला कळत  नाही कि त्यांना माझ्याकडून सगळ काढण घ्यायचं असत कि माझे मित्र म्हणून ते सहज विचारत असतात."
मी - "अवनी, आई बाबा मित्र होण्याचा प्रयत्न करतील च पण प्रश्न हा आहे कि तुझे विचार काय आहेत? प्रेम अस fashion म्हणून करू नकोस, प्रेम अस college मधला compulsary विषय म्हणून करू नकोस, कोणाशी पैज लागली म्हणून करू नकोस, कोणाला दाखवायचं कि माझा पण BF आहे म्हणून करू नकोस. ते जेव्हा होईल तेव्हा होऊ दे.  ठरवून नको करून. ते जेव्हा अनुभवता येईल तेव्हा अनुभव घे घाई नको करू."

अवनी- "आई बाबा तुला पुढल्या वेळी घरात घेणार नाही. मला प्रेमाची महती सांगतोय."

मी - "अवनी ज्या गोष्टी मुळे संपूर्ण आयुष्य सुंदर होत  गोष्ट चुकीची अस कस सांगू तुला ?? लग्न झाल कि प्रेम करायला शिक अस सांगायला मी काही मूर्ख नाही. प्रेमावर आत्ता पासूनच विश्वास असला पाहिजे ते जेव्हा भेटेल तेव्हा भेटो !!!"

अवनी- "काका, हे तुझे विचार. मला वाटत नाही आई-बाबा पण इतके मोकळ्या स्वभावाचे असतील. "
मी - "प्रेम याबद्दल तुझे विचार जाणण्यासाठी आणि माझ मत सांगण्यासाठी मी तुला बोलत केल. मी तुझा काका होवून हे बोलू शकत नाही पण मित्राच्या वेशात येवून काकाचे विचार ऐकवू शकत नाही. तू प्रेम कर अस मी म्हणत नाही, करू नकोस अस पण नाही. माझ म्हणण एकच आहे कि प्रेम सुंदर असत आणि ठरवून करता येत नाही."
अवनी- "काका !! " अवनी मला येवून बिलगली. तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या . पण तिच्या cool  स्वभावामध्ये बसत नसल्याने ती रडत नव्हती. आणि प्रेम काय हे कळल म्हणून डोळे ओले होण्यापेक्षा प्रेम ऊमजल म्हणून तिने आनंदी व्हाव हि माझी पण इच्छा होती.

तिच्या आई बाबांना मला हेच सांगायचं होत कि तिच्या वयाला साजेसा सल्ला देण्याच्या नादात तिला प्रेम वाईट असत अस सांगू नका, प्रेम सुंदर असत आणि ते करण्याची ताकद तिला द्यायला हवी.

तिच्या वयात नाही पण अभय-वासंतीच्या वयात तर प्रेमाच महत्व आणि किंमत नक्कीच कळायला हवी. हो ना ??


अमित जहागीरदार
पुणे
ऑगस्ट २०१५

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ५ - कांदा पोहे

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ५ - कांदा पोहे

आता मात्र अति झालय. म्हणजे रोज रोज जर तेच होणार असेल तर मी शांत पणे बघू शकत नाही. मला याबद्दल काहीतरी कराव लागणारच. पण एकदम विषय तक्रारीचा नाही होऊ शकत पण मी सहन सुद्द्धा करू शकत नाही. स्वराली शी बोलाव कि नाही असा विचार करत मी जवळ पास २-३ आठवडे घालवलेत. पण मी हे रोज रोज बघत होतो आणि आणि माझ्या वागण्यातून तिला कदाचित कळलंच असेल.

रोज सकाळी स्वराली आली कि मी उत्सुकतेने तिच्या … … … डब्याकडे बघायचो आणि तिने आज काय आणल असेल हा विचार करायचो. सकाळी ८ वा आम्ही office मध्ये यायचो म्हणजे संध्याकाळी लवकर निघता  येईन मग नाश्ता office  मधेच करावा लागायचा. स्वराली माझ्या बाजूला बसायची म्हणून कधी कधी आम्ही डबा share  पण करायचो . पण मला हे कळायला फार जास्त दिवस लागले नाहीत कि स्वराली ६ पैकी ४ दिवस फक्त पोहेच आणते. मला जरा  कंटाळा यायला लागला होता. मी तिच्यासोबत नाश्ता करणे पण टाळू लागलो होतो.

हो हे अगदी खर आहे. स्वराली फक्त कांदा पोहेच आणते डब्यामध्ये आणि मला का ते कळत नाही. कुणाच्या डब्यात काय असावं याच्याशी मला काहीच देणे घेणे नाहीय पण रोज रोज तोच पदार्थ आणण्यामागे काय हेतू असावा हे मला शेजारी बसतो म्हणून कळायला हव ना !! मी आज हट्टाला पेटलो होतो.
" स्वराली रोज कांदा पोहेच कसे असतात ग ! तुला दुसर काही येत नाही कि काय ??"
" अरे अमित !! मला सगळ येत रे पण सकाळची सुरुवात आम्ही कांदा पोह्यानेच करतो"
" म्हणजे तुझा नवरा पण रोज हेच खातो ??"
" मी तरी एखाद्या दिवशी दुसर काही तरी आणते पण तो तर गेले ५-६ महिने म्हणजे लग्न झाल्यापासून तेच खातोय "
डोक्याकडे हात नेवून मी screw  धिल्ला झाल्याची खुण  केली तर ती लाडिक चिडली आणि बोलली कि आता गडबडीत आहे . lunch सोबत करू मी सगळ सांगते. मला कधी एकदा lunch  time  होतोय अस झाल होत.  पुष्कळ काम असल्यामुळे lunch  time  ने यायला जास्त वेळ घेतला नाही स्वराली direct  कॅण्टीन मध्ये आली.
कदाचित माझ्या चेहऱ्यावर उत्सुकता खूप ओथम्बुन वाहत होती. काही आढेवेढे न घेत ती बोलू लागली.

मी आणि सौमित्र एकाच college मधले, एकाच क्लास मधले. सौमित्र खूप लाजरा बुजरा होता पण माझ्याशी जरा जास्त जुळायच त्याच्याशी !! पहिल्या दोन वर्षात एकदाही नजरेशी नजर न भिडवणारा तो thrid  year पासून माझ्याशी बोलू लागला म्हणजे मीच त्याला बोलत केल.  कधी notes  घेण्याच्या बहाण्याने तर कधी एखाद्या program  च्या coordination निम्मिताने. सहसा अश्या लोकांचे दोनच प्रकार असू शकतात . एक म्हणजे खरोखर लाजरे किंवा खूप चालू पण सोज्वळ असल्याचा आव आणणारे. मला एक दोन भेटीतून कळल कि तो दुसऱ्या प्रकारातला नाहीय. एक छान सुंदर मैत्री करायला तेवढ पुरेस असत !!

मी ऐकत होतो स्वराली सोबत अगदी तिच्या college  मध्ये जावून त्यांच्या class  चा एक भाग झालो होतो मी !!

" सौमित्र आणि मी वरचे वर भेटू लागलो, वेळ घालवू लागलो, गप्पा वाढू लागल्या. घरात खूप कोड-कौतुक झाल्यामुळे तो खूप लाजरा झाला होता आणि मुलींशी स्वताहून ओळख करणे म्हणजे तर त्याला डोंगरा एवढ कठीण वाटायचं. माझ्याशी ओळख झाली आणि त्याचा तो confidence  थोडा वाढला मग त्याने त्याचे एक दोन प्रयोग पण केलेत. तरी माझ्याशी त्याची खूप खास मैत्री झाली. एकदम वाळवंटातून हिरव्यागार जंगल्यात आल्यासारखं झाल त्याच्या बाबतीत . मला नेहमी वाटायचं कि तो वाहवत जाईन आणि एक दिवस मला propose  करेल. फायनलला jobs  लागलेत तेव्हा तर जोडया लावा हा college  मधला सामूहीक खेळ झाला होता . अगदी betting व्हायचं यावर माझी जोडी कधी सौमित्रशी लागते याची सगळ्यांना घाई झाली होती पण आमच्या दोघांमध्ये असा काहीच नव्हतं. सौमित्र पण तस कधी बोलला नाही किंवा मला जाणवलं नाही."

"college  संपल्यावर घरी जात असतांना तो मला स्टेशन वर सोडायला आला होता. मग मीच त्याला विचारलं कि तू काही निवड केली नाहीस का कुणाची girlfriend म्हणून  ?? तो हसला आणि म्हणाला कि मला मैत्रीच  इतक सुंदर नात आत्ता कुठे उमगलंय. हेच enjoy  करू दे. प्रेम काय भेटेल जेव्हा भेटायचं तेव्हा. त्याच्या नादात  मला मैत्रीच नात गमवायच नाहीय .
इतके दिवस मी कधी विचार केला नाही पण त्याच्या त्या बोलण्याने आणि मैत्रीविषयी असलेल्या  मनातल्या शुद्ध भक्ती मुळे  मला त्याच्याबद्दल खूप वेगळा  विचार यायला लागले. शेवटी प्रेम म्हणजे तरी काय ?? एक उत्कट भावना आणि नंतर मैत्रीच ना. "
" मी नोकरी शोधण्यासाठी पुण्यात आली कारण सैमित्र पण पुण्यात होता . त्याची मदत होईल हा हेतू आणि माझ्या मनात त्याच्या बद्दल ओढ पण होती. तो मला सकाळी interview च्या ठिकाणी सोडायचा. सकाळी घाई झाली कि तो कधी कधी माझ्या साठी खायला बिस्कीट वगैरे घेवून यायचा. एक असाच खास दिवस होता तो सौमित्र ला सुट्टी होती म्हणून तो माझ्या सोबत आला होता. interview  च्या घाई मध्ये त्याने दिलेला डबा  मी खावू शकले नाही.  आणि दुपारी interview  झाल्यावर तो आणि मी एका निवांत जागी बसलो आणि मी डबा  बाहेर काढला. त्यात पोहे होते ते पण त्याने बनवलेले. मी डबा  खाल्ला नाही म्हणून तो थोडा  चिडला होता.
मी पोह्यांच कौतुक करत म्हणाले मला जर असे पोहे रोज  मिळणार असतील तर मी आयुष्यभर interview  देईन."
तो चिडला आणि म्हणाला कि  तुला नोकरी मिळावी अशी मी रोज प्रार्थना करतो आणि तू हे काय बोलतेय??
मी म्हणाले कि मला तर हे पोहे आयुष्यभर खावेसे वाटतात.
तो थोडा गंभीर झाला आणि बोलला कि आयुष्यभर थोडीच खाणार ?? आता मी देईन पण मग तुला तुझ्या नवऱ्याकडून खावे लागतील.
"मी थोड्या लाडिकपणे  म्हणाली कि मग मला पोहे आयुष्यभर खावू घालण्यासाठी तूच माझा नवरा हो ना. कठीण आहे का ?? "
"मी केलेलं अस भन्नाट proposal त्याच्या पचनी पडायला खूप वेळ लागला. पण तो लगेच राजी झाला. प्रेमाची भेट म्हणून मी त्याला पोह्याचा घास भरवला.

अशी आमची स्टोरी कांदा पोह्यांची . "


स्वराल्ली सांगून दमली नव्हती पण मी ऐकून थकलो होतो. पण एकदम तिच्या डब्यातल्या गरम गरम पोह्याचा सुवास आठवला आणि मन प्रसन्न झाल !!

खर तर कांदा पोहे म्हणजे arrange  marriage वाल्यांचा trademark. पण त्याची अशी सुंदर, मसालेदार आणि रंजक propose करण्याची गोष्ट मला कळली होती. आता मी स्वरालीच्या डब्यात पोहे बघून चिडत नाही पण तिला चिडवतो. तरी अजून मी तिच्या घरी येण्याच्या हट्टाला बळी पडलो नाही. अहो त्याच प्रेम जमल म्हणून  ते रोज पोहे खावू शकतात पण मला थोडीच जमणार आहे !!!! आमच्या प्रेमाला आणि संसाराला इडली, उपमा, थालीपीठ किंवा अगदी sandwich पण चालत !!!


अमित जहागीरदार
०२-०३ ऑक्टोबर २०१५
पुणे